जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणार्]या या पुस्तकातून प्रीताजी आणि कृष्णाजी सजगतेनं संपत्तीची निर्मिती, जोडीदारासोबत प्रेमपूर्ण नातं आणि स्वतःच्या आंतरिक शांतीचा शोध या विषयांवर प्रकाश टाकतात. ते आपल्याला साध्या व परिणामकारक ध्यानपद्धती, हसत-खेळत शिकवण्यात येणारे धडे आणि अत्यंत प्रभावी अंतर्दृष्टी देऊन आपल्या चेतनेत परिवर्तन घडवतात, त्यामुळेच आपली स्वप्नं सत्यात उतरतात. एक अतिशय सुंदर जीवन जगण्यापासून तुम्ही फक्त चार पायर्]या दूर आहात, यासंबंधी हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल.